साहित्य :-
१. १/२ कप मैदा
२. चवीनुसार मीठ
३. १ चमचा ओवा
४. कणिक मळायला पाणी
कृती :-
वरील सर्व साहित्य एकत्र करून पोळीच्या कणकेप्रमाणे कणिक मळून घ्यावी. थोडावेळ ती कणिक झाकून ठेवून मग त्याच्या पुऱ्या लाटायला घ्याव्यात. पुरी लाटली की त्याला सुरीने चिरा पाडाव्यात म्हणजे ती पुरी फुगणार नाही व कुरकुरीत होईल. त्या चिरा पाडलेल्या पुऱ्या तेलात तळून घ्याव्यात. या पुऱ्या प्रवासात नेण्यासाठी अतिशय उपयोगी होतात व साधारण ४ - ५ दिवस छान टिकतात.
वाढणी :- या साहित्याच्या साधारण १५ ते २० पुऱ्या होतील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा