साहित्य :-
१. २ कप शिजलेला भात
२. पाव कप बारीक चिरलेला कांदा
३. ३ ते ४ मध्यम आकाराचे टोमॅटो
४. २ सुक्या लाल मिरच्या
५. २ हिरव्या मिरच्या
६. ७ ते ८ कढीपत्त्याची पानं
७. २ चमचे उडदाची डाळ
८. १ चमचा हरभरा डाळ
९. ३ ते ४ चमचे शेंगदाणे
१०. जीरं व मोहरी
११. चवीनुसार मीठ
१२. थोडीशी हळद
कृती :-
प्रथम एका कढईमध्ये तेल तापवावे. तेल तापल्यावर त्यात मोहरी व जीरं घालावं. दोन्हीही तडतडले की मग त्यात कढीपत्ता व लाल मिरच्या घालाव्यात. नंतर हरभऱ्याची डाळ घालून छान परतून घ्यावी. उडदाची डाळ घालावी व शेंगदाणे घालावेत. सर्व गोष्टी छान परतल्या, डाळींचे रंग बदलले की त्यात चिरलेला कांदा घालावा. कांदा मऊ होईपर्यंत परतावे. मग हिरव्या मिरच्या चिरून घालाव्यात. मग त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालावा. थोडंसं मीठ घालावं. टोमॅटो छान मऊ होईपर्यंत शिजू द्यावे. थोडीशी हळद घालावी. मग यात शिजलेला मोकळा भात घालावा. चवीनुसार मीठ घालावे व सर्व जिन्नस छान एकजीव करावेत. कोथिंबीर घालून हा भात गरम गरम serve करावा.
टीप :- भात शिजवतानाच मीठ घातले तर एकजीव करणे अजूनच सोपे होईल.
वाढणी :- ३ ते ४ माणसे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा