साहित्य :-
१. ४ ते ५ कप दही
२. दीड ते २ कप साखर
३. १ चमचा वेलची पूड
४. केशर चिमूटभर
५. १ चमचा चारोळी (ऐच्छिक)
कृती :-
एका कपड्यामध्ये दही गुंडाळून ते रात्रभर टांगून ठेवावा. म्हणजे दह्यातून सगळं पाणी निथळून जाईल आणि चक्का आपल्याला मिळेल. मग या चाक्क्यामध्ये साखर घालावी. साखर विरघळली की हा साखर घातलेला चक्का एका चाळणीमध्ये घेऊन हाताने दाबत दाबत फेटून घ्यावा. असं केल्याने अतिशय मऊसर आणि गुठळ्या नसलेले श्रीखंड तयार होईल. मग त्यात वेलची पूड, केशर आणि आवडत असल्यास चारोळी घालावी व पोळी किंवा पुरीसोबत serve करावे. जर याच चक्क्यामध्ये आंब्याचा पल्प घातला तर श्रीखंडाचे आम्रखंड तयार होईल. फक्त आम्रखंड केले तर त्यात वेलची पूड घालू नये. आंब्याचा स्वतःचाच स्वाद इतका छान असतो की त्याला इतर स्वादांची गरज भासत नाही.
जर तुम्ही दही टांगून ठेवायला विसरला असाल तर दही एका कापडात घ्यावं आणि वर्तमान पत्राचा एक गठ्ठा खाली ठेवून त्यावर कापडात गुंडाळून ठेवलेलं दही ठेवावं. वरून परत वर्तमान पत्राचा एक गठ्ठा ठेवावा आणि त्यावर जाड वजनदार वस्तू ठेवावी. १० ते १५ मिनिटांनी वर्तमान पत्र काढून ती बदलावीत. पुन्हा अशीच कृती २ वेळेला करावी. दह्यातलं पाणी निघून छान घट्ट चक्का तुम्हाला मिळेल.
वाढणी :- ३ ते ४ माणसे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा