११ ऑगस्ट, २०११

नारळी भात


साहित्य :-
१. बासमती तांदूळ १ कप
२. २ चमचे तूप
३. ४ ते ५ लवंगा
४. २ ते २ १/२ कप पाणी
५. किसलेला गूळ १ कप
६. पाव चमचा वेलची पूड
७. अर्धा कप खवलेला नारळ

कृती :-
प्रथम तांदूळ धुऊन १५ मिनिटं भिजवून ठेवावेत. एका कढईमध्ये २ चमचे तूप घ्यावे. तूप तापले की त्यात लवंगा घालाव्यात. तुपामध्ये लवंगा फुगल्या की त्यात भिजवलेले तांदूळ घालावेत व २ ते ३ मिनिटे परतावेत. तांदूळ परतला गेला की त्यात प्रथम २ कप पाणी घालून झाकण लावावे व भात छान शिजू द्यावा. आवश्यक वाटल्यास पुन्हा थोडे पाणी घालावे. भात मऊ शिजला की त्यात किसलेला गूळ घालावा. गूळ घातल्यावर भात परत थोडा पातळ होईल. तो पातळपणा पूर्ण आटला की मग त्यात नारळ घालून ५ मिनिटं शिजू द्यावा. या भाताच्या मुदी करून गरम गरम serve कराव्यात.

वाढणी :- २ ते ३ माणसे

1 टिप्पणी: