साहित्य :-
१. भिजवलेले तांदूळ १ कप
२. लाल सिमला मिरची पाव कप
३. लाल टोमॅटो पाव कप
४. ४ ते ५ सुक्या लाल मिरच्या
५. किसलेलं गाजर पाव कप
६. व्हेजिटेबल स्टॉक
७. बारीक चिरलेला कांदा
८. ऑलिव ऑईल
९. चवीनुसार मीठ
१०. ४ ते ५ लसूण पाकळ्या
कृती :-
प्रथम एका पॅनमध्ये ऑलिव ऑईल घेऊन त्यात लाल सिमला मिरचीचे मोठे तुकडे, टोमॅटोचे मोठे तुकडे, लसणाच्या पाकळ्या आणि लाल मिरच्या सर्व घालून परतत ठेवावे. हे सर्व पदार्थ करपल्यासारखे थोडे थोडे काळसर दिसेपर्यंत परतावेत. मग गार झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्यावेत. एका कढईमध्ये ऑलिव ऑईल घेऊन त्यात कांदा घालावा. तो मऊ होईपर्यंत परतून घ्यावा. त्यात भिजवलेले तांदूळ घालावेत. थोडावेळ परतून मग त्यात मिक्सरमध्ये वाटलेला मसाला घालावा.हा मसाला तुम्हाला किती तिखट पाहिजे त्या चवीनुसार घालावा. बऱ्याचदा सगळा मसाला वापरण्याची गरज भासत नाही. हा उरलेला मसाला फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये ७ ते ८ दिवस टिकतो. व्हेजिटेबल स्टॉक मिळाला तर तो घालून भात शिजवावा नाहीतर साध्या पाण्यात भात शिजवला तरी चालतो. व्हेजिटेबल स्टॉक घालून भात शिजवताना मिठाची चव घेऊन लागेल तसे मीठ घालावे. स्टॉक घातल्यावर भात शिजायला जरा वेळ लागतो. भात थोडा शिजत आलं की त्यात किसलेलं गाजर घालून भात पूर्ण शिजवून घ्यावा. हा भात सोअर क्रीम व सलाड सोबत गरम गरम serve कारावा.
वाढणी :- २ ते ३ माणसे.