साहित्य :-
१. १ वाटी चौकोनी चिरलेलं गाजर
२. १ वाटी चिरलेला श्रावण घेवडा
३. १ वाटी चिरलेला फ्लॉवर
४. १ वाटी मटारचे दाणे
५. फोडणीसाठी तेल
६. अर्धा चमचा शाही जिरं
७. आलं लसूण पेस्ट प्रत्येकी अर्धा चमचा
८. १ वाटी बारीक चिरलेला कांदा
९. १ वाटी बारीक चिरलेला टोमॅटो
१०. १ ते २ हिरव्या मिरच्या
११. अर्धा चमचा हळद
१२. १ चमचा तिखट
१३. १ चमचा धने पूड
१४. १ वाटी घुसलेलं दही
१५. पाव वाटी तूप
१६. चिमूटभर केशर दूधात भिजवलेलं
१७. अर्धा वाटी तळलेला कांदा
१८. खडा मसाला :- वेलची, लवंग, तमालपत्र, मिरी, मसाला वेलची
१९. २ कप भिजवलेला बासमती तांदूळ
२० चवीनुसार मीठ
२१. बारीक चिरलेला पुदिना व कोथिंबीर प्रत्येकी अर्धी वाटी
२२. गरम मसाला १ चमचा
कृती :-
प्रथम एका भांड्यामध्ये पाणी गरम करावे. त्यात चवीनुसार मीठ व खडा मसाला घालावा. भिजवलेले तांदूळ घालावेत. भात शिजत आला की उपसावा. पुन्हा एका भांड्यामध्ये पाणी तापवावे. त्यात चवीनुसार मीठ घालून गाजर, फ्लॉवर, श्रावण घेवडा व थोड्यावेळाने मटार घालावेत. या भाज्या थोड्या शिजेपर्यंत उकडून घ्याव्यात. भाज्या शिजत आल्या की उपासाव्यात. एका भांड्यात तेल तापवावे. त्यात शाही जीरं घालावं. जीरं तडतडलं की त्यात कांदा घालावा. आलं लसूण पेस्ट घालून १ मिनीटभर परतावं. त्यात टोमॅटो घालून तो मऊ शिजेपर्यंत परतावा. मग त्यात मसाले अर्थात हळद, तिखट व धणे पूड घालावी. मसाले परतून घ्यावेत. त्यात दही घालावं व शिजलेल्या भाज्या घालून गरज असल्यास थोडासा मीठ घालून थोडावेळ शिजवावं. आता एका पातेल्यात खाली भाजीचा एक थर घालावा. वर भाताचा एक थर घालावा. त्यावर थोडा गरम मसाला, पुदिना, व कोथिंबीर घालावी. पुन्हा राहिलेल्या भाजीचा थर घालावा. भाताचा थर घालावा. वरून गरम मसाला, पुदिना व कोथिंबीर घालावी. तळलेला कांदा घालावा. वरून केशराचं दूध घालावं. तूप घालावं, काजूचे तुकडे व बेदाणे घालून बिर्याणी आचेवर ठेवावी. प्रथम पहिले १० मिनिटंमोठ्या आचेवर ठेवावी व नंतर मंद आचेवर १५ मिनिटं ठेवावी. बिर्याणी तयार!!
वाढणी :- ३ ते ४ माणसे