साहित्य:-
१. भिजवलेले अक्खे मसूर १ कप
२. उभा चिरलेला कांदा अर्धा कप
३. किसलेलं आलं अर्धा चमचा
४. हळद अर्धा चमचा
५. धणे पूड १ चमचा
६.जीरं पूड अर्धा चमचा
७. बिर्याणी मसाला १ चमचा
८. २ सुक्या लाल मिरच्या
९. भिजवलेला तांदूळ दीड कप
१०. चवीपुरते मीठ
११. सजावटीसाठी कोथिंबिर
कृती:-
मसूर ७ ते ८ तास पाण्यात भिजवून ठेवावेत. नंतर एका कढईमध्ये तेल घेऊन त्यात जीरं व मोहरीची फोडणी करावी. सुक्या लाल मिरच्या घालावयात. मोहरी तडतडली की त्यात उभा चिरलेला कांदा घालून तो मऊ होईपर्यंत परतावा. आलं घालून पुन्हा परतावा. मग त्यात भिजवलेले मसूर घालावेत. थोडावेळ परतून मग त्यात हळद, धणे जीरं पूड व बिर्याणी मसाला घालावा. तांदूळ कृती सुरु करण्यापूर्वी भिजवावेत. म्हणजे १५ मिनिटे तांदूळ पाण्यात भिजतील. सगळे मसाले घालून २ ते ३ मिनिटे मसूर परतले की मग त्यात भिजवलेला तांदूळ घालावा. तांदळाच्या दुप्पट पाणी घालावे व चवीनुसार मीठ घालून भात शिजवावा. भाताला उकळी आल्यावर आच मंद करून १० मिनिटे भात झाकण लावून शिजवावा. कोथिंबिर घालून हा भात दह्यासोबत किंवा रायत्या सोबत serve करावा .
वाढणी :- २ ते ३ माणसे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा